मोठी बातमी : महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या पीआरओचा मृत्यू

Ashish Mete

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Ashish Mete

Aditi Tatkare PRO Death : महिला व बाकल्याणमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचा पीआरओ म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष मेटे (Ashish Mete) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मुंबईतील भांडुपमध्ये इमारतीच्या आवारात चालताना आशिष मेटे अचानक खाली कोसळले. यावेळी मेटे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. एका खासगी एजन्सीकडून आशिष मेटे यांची तटकरे यांच्याकडे पीआरओ म्हणून नियुक्ती झाली होती.


IPL 2027 ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत थेट सरकारी सेवेत नव्हते. एका पब्लिक रिलेशन कंपनीच्या माध्यमातून ते पीआरओ म्हणून नियुक्तीला होते. त्यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रसिद्धी, जनसंपर्क विषयक कामे ते हाताळत होते. आशिष मेटे मेटे यांच्याप्रकरणी भांडूप पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मेटे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत FDA ची अचानक ‘एन्ट्री’; जेवणाचे सॅम्पल घेतल्याने चर्चेला उधाण

भांडूप परिसरातील एका इमारतीच्या आवारात जेवण झाल्यानंतर ते फिरत होते. त्याचवेळी आशिष मेटे अचानक जमिनीवर कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

महिन्याला 2.5 कोटी रुपयांची उलाढाल करायचा म्हणे PRO ?
या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अयोध्या पोळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांच्या पीआरओ यांची शतपावली करताना चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असं म्हटलं जात आहे. सदरील प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, PRO ज्या बिल्डिंगखाली शतपावली करत होता त्याचे सीसीटीव्ही समोर आले पाहिजे. प्रकरण वेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. महिन्याला 2, 2.5 कोटी रुपयांची उलाढाल करायचा म्हणे PRO ? मध्यरात्री शतपावली करत होता हे पटण्यासारखं नाही, आणि खुप उशिराने तो पडलेला दिसला, तो मुंबईत कोणासोबत राहत होता आणि महिन्याला कोट्यावधीची उलाढाल करायचा असं कळतंय, अलीकडेच त्याचे उठबस आणि राहणीमान उंचावले होते अशा एक ना अनेक चर्चा आहे. त्यामुळे एका सामान्य घरातील कार्यकर्त्याचे असे जाणे पटत नाही म्हणुनच निष्पक्ष चौकशी करुन सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी अयोध्या पोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केली आहे.

follow us